अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या : १२ दिवसांनंतर मृतदेह आढळला, भाऊच निघाला संशयित!

भाऊच निघाला संशयित!
या हत्येच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, अशोक धोडी यांचे भाऊ अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले आहेत. त्यामुळे दोघांमधील पूर्वीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अपहरणानंतर थेट हत्या
२० जानेवारी रोजी अशोक धोडी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी घरी फोन करून लवकरच पोहोचतो असे सांगितले होते. मात्र, घोलवड परिसरातून वेवजीला परतताना त्यांच्या वाहनासह त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात दिली होती.
गुन्हा दाखल, संशयित फरार
अनेक दिवस तपास करूनही काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी काही जणांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी अविनाश धोडी (वेवजी, तलासरी), मनोज राजपूत (सरिगाम, गुजरात) आणि सुनील धोडी (जामशेत, डहाणू) या तीन जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने या गुन्ह्यात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.