आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक विवाह सोहळा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती


या सोहळ्यात १५० आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांचे विवाह पार पडले. प्रताप सरनाईक यांनी सर्व नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या आणि आधार प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
पालघरसारख्या आदिवासी व ग्रामीण भागात जगदीश धोड़ी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अशा सामूहिक विवाहांचे आयोजन होत असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळतो, असे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
या विवाह सोहळ्यात नवविवाहितांना कन्यादानासह संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हिंदू व आदिवासी या दोन्ही पद्धतीने विवाह लावण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात एकोपा आणि मदतीचा भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.