विद्यार्थिनीला 50 उठाबशा; मुख्याध्यापकाचा धक्कादायक प्रकार

भगिनी समाज शाळेत विद्यार्थिनीला शाळेत फक्त पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे 50 उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे दहावीतील विद्यार्थिनी द्विता विनोद पाटील हिला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. सध्या तिच्यावर पालघरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांनी मुख्याध्यापकावर नेहमी विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. द्विताच्या पालकांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणावर शाळा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीवर योग्य कारवाई होण्याची मागणी पालकांकडून होत आहे.