डहाणू: महावितरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ग्राहकावर महावितरण विभागाकडून चार लाख रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याची भीती दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, ग्राहकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर कारवाई करण्यात आली.
एसीबीने अतुल आव्हाड यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास सुरू असून, महावितरण विभागातील अन्य कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
या कारवाईमुळे महावितरण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
या सरकारी लोंकाना पगार कमी आहे बिचारे कसे तरी आपल्या कुटुंबाचं पोट भरत आहेत .मग काय करणार लाच घ्यावी लागेलचं ना.आपल्याला काय पैश्याची कमी आहे,महिना भर काम केलं की 10 ते 12 हजार भेटतात किती पैसे खर्च केले तरी संपत नाही मग आपल्याला लाच घ्यायची गरज भासत नाही🤣🤣