जि.पालघर मधील डहाणू तालुक्यामध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी पाण्याचा विषयावर पंचायत समिती वरती 4000 महिलांचा धडक हंडा मोर्चा काढण्यात आला . या मोर्च्याचे नेतृत्व जन् वादी महिला संघटनेच्या अद्यक्ष्या लहानी दौडा, तसेंच कॉम्रेड मेरी रावते, लता गोरखना,नीलिमा माळी, रूपाली राठोड,लखमी वाघात, मीना गहला करत होत्या . मोर्च्याच्या प्रमुख मागण्यान मध्ये जल जीवन मिशन या योजनेवर ती जास्त भर देऊन घर घर नल योजनेची परिस्थिती पाहता त्याच्यावर तात्काळ पर्याय म्हणून पाणी खराब असलेले बोर हे लगेच साफ करून घेणे व ज्या ठिकाणी खूपच पाण्याची टंचाई आहे अशा ठिकाणी नवीन बोर मारने व फाटलेले पाईप त्वरित दुरुस्त करून देण्यात यावे. त्याच्यावरती त्वरित् अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ज्या ठिकाणी नवीन बोर मारायचे आहेत ते नवीन बोर आणि खराब पाणी असलेले बोर पंधरा दिवसात मारून दिले जातील असं लेखी पत्र अधिकाऱ्यांनी जनवादी महिला संघटनेला दिला.